रात्री माझी पाळी जड का असते?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 13:14

पाळी जास्त जाणे

पाळी जास्त जाणे म्हणजे पाळीत जास्ती रक्तस्राव जाणे. काही वेळा गर्भाशयाच्या गाठी,गर्भनलिका व बीजांड यांची सूज, शरीरातील इतर प्रकारचे दोष (उदा. रक्तस्रावाची प्रवृत्ती असणे) इत्यादींमुळे पाळी जास्त जाते. मात्र अनेक स्त्रियांमध्ये याचे कसलेही कारण सापडत नाही. या प्रकारात पाळी वेळच्या वेळी येते, पण बरेच दिवस रक्त जाते. रक्तस्राव जास्त गेल्याने रक्तपांढरी होऊ शकते.

पाळी जास्त जाण्याचे कारण शोधणे हे स्त्रीरोग तज्ज्ञाचेच काम आहे. यासाठी गर्भाशयाचा अंतर्भाग खरवडून काढून (क्युरेटिंग) तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. या तपासणीत काही अंदाज बांधता येतो. मात्र सर्वच रुग्णांच्या बाबतीत निदान होऊ शकत नाही.

या खरवडण्यामुळे आतले आवरण जाऊन तात्पुरता रक्तस्राव थांबतो. (हे आवरण परत निर्माण होते) निदान काही स्त्रियांना तरी यामुळे थोडा उपयोग होतो. काहींच्या बाबतीत स्त्रीसंप्रेरके देऊन रक्तस्रावावर नियंत्रण करता येते. ज्या स्त्रियांना वारंवार औषधे घेऊन विशेष उपयोग होत नाही, त्यांच्या बाबतीत बहुधा गर्भाशय काढून टाकण्याचे ऑपरेशन करावे लागते.

काही स्त्रियांना गर्भाशयाचा काहीच आजार दिसत नसून रक्तस्रावाचा त्रास होतच रहातो. अशा वेळी टी.सी.आर. नावाचा उपचार करतात. यात ऑपरेशनने गर्भाशय काढत नाहीत पण दुर्बिणीतून लेझरच्या साहाय्याने गर्भाशयाचे आतले आवरण जाळून टाकतात. या क्रियेनंतर ब-याच स्त्रियांची पाळी जाते. काही स्त्रियांना सुरुवातीला पाळी जाते पण काही महिन्यांनंतर पुन्हा पाळी सुरु होते. पण ही पाळी त्रास होण्याएवढी नसते. काही स्त्रियांना मात्र परत त्रास सुरु होऊन गर्भपिशवी काढून टाकण्याचे ऑपरेशन करावे लागते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info